आज भारत
स्वतंत्र होऊन तब्बल अर्ध शतक उलटलं तरी सुद्धा ईथून जातियवाद जाताना दिसत नाहीये.
जागतिकीकरणाचे वारे एकीकडे देशाला नविन स्वप्ने रंगविण्यास सांगत आहेत तर दुसरीकडे
जातीयवाद आमच्या देशातील विकासाला पायाबंद करण्याचे काम करत आहे. आजचा तरुन
स्वकर्तुत्वावर जागतिक पातळीवर आपली ओळख तयार करत आहे. आपल्या कुवतीच्या बळावर
भारतातील तरुणानी जगभर भारतीय पाऊलखुणा उमटविल्या त्याच वेळी दुसरीकडे आमचा समाज
जातीयवादाचे नवनवीन रेकॉर्ड बनवित आहे. जातियवादात आजवर सर्व लोकानी ब्राह्मणाच्या
नावानी जरी खडे फोडले तरी ब्राह्मण समाज आज त्याच्यातून बाहेर पडताना दिसतो आहे.
मात्र मराठा समाज आजुनही जातीयवादातून बाहेर पडण्याच्या मनस्थीतीत नाही हे
वेळोवेळी सिद्ध होत आहे.
१५ सप्टे १९९८
रोजी बोरगाव, ता. कवठेमहंकाळ जि. सांगली येथील बौद्ध वस्तीवर मराठा समाजानी हल्ला
चढविला. कारण काय तर एक मराठा मुलगी बौद्ध
मुलासोबत पळून गेली. बास....... जातीयवाद्यानी याचा बदला घेण्याचे ठरविले. ५०० ते ६००
जातियवादी मराठ्यानी गावातील बौद्धाना शोधून शोधून मारले. बायका, पोरी, मुलं व
पुरुष मंड्ळीना हाल हाल करुन मारण्यात आले. कित्येक बौद्ध बांधव मराठ्यांच्या
दहशतीपायी गावातून पळून गेले. जातियवाद्यांच्या क्रुरपणाला घाबरुन गावातील लोकं
जिकडे लपून बसली. बौद्ध बांधवांच्या एकून ४८ घराना जातियवाद्यानी आग लावली. उभी
वस्ती पेटवून देण्यात आली. डोळ्याच्या पुढे आपली घरे जळताना बघून बौद्ध बांधव
अस्वस्थ झाले. पण मराठ्यांच्या पुढे एक न चालणार याची जाण असल्यामूळे सर्वजण जीव मुठीत
घेऊन पळून गेले. अन मस्तावलेल्या जातीयवाद्यानी रात्रभर हौदोस घातला. त्यानंतर
उभ्या जिल्ह्यात हाहाकार माजला. नेहमी प्रमाणे पोलिसानी जातियवाद्यांची बाजू घेत असंवेदनशीलता
दाखविली. नंतर महाराष्ट्रातुन बौद्ध
समाजानी प्रतिक्रिया नोंदविल्यावर १२८ जातियवाद्याना अटक करण्यात आले. त्यांच्यावर
एट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अन आज तब्बल १३ वर्षा नंतर २८ जुलै
२०११ ला या खटल्याचा निकाल लागला. सरकार तर्फे ऍड. ए. डी. मधाळे व झेड. यू.
सांगलिकर यानी काम पाहिले तर बचाव पक्षातर्फे जयसिंगराव पाटिल व पुरोहितानी काम
पाहिले.
२७ आरोपीना ७
वर्ष सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ती नावे खालील प्रमाणे आहेत.
१)
1) १)बालासाहेब वासुदेव लिगाडे २)
पोपट पांडुरंग भोसले. ३)
अप्पासाहेब गोपाळ पाटिल ४)
वैभव शंकर पाटिल ५)
पांडुरंग विष्णू पाटिल ६)
बाळासाहेब बजरंग पाटिल ७)
नंदकुमार मधुकर पाटिल ८)
बाळासाहेब बापूसाहेब पाटिल९)
सुर्यकांत आप्पासाहेब पाटिल १ ०)
बसंत विष्णू पाटिल ११)
वसंत विठ्ठल पाटिल १२)
गोपाल दिनकर पाटिल १३)
शिवाजी एकनाथ पाटिल १४)
दिनकर विनायक पवार १५)
जनार्दन पांडुरंग देसाई १६)
मारुती शंकर पवार १७)
जगन्नाथ शंकर पवार १८)
राजेश शंकर लिगाडे १९)
विलास गोविंद माने २०)
अनिल शंकर परिट २१)
विलास आनंदराव पाटिल २२)
नारायण रंगा मंडले २३)
वसंत विनायक पवार २४)
विजय जगन्नाथ पाटिल २५)
बाळासाहेब शामराव पाटिल २६)
पांडुरंग नारायण सुतार २७)
किरण बाळासाहेब पाटिल
वरिल यादी
बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की खेड्या पाड्यात जातियवादी कारवाया कोण करत आहे. ब्राह्मणांकडॆ बोट दाखविणारे मराठे बौद्धांच्या वस्त्या पेटवुन देतात. तेही आबा
पाटलाच्या मतदार संघात ही घटना घड्ते. आज बौद्धाना खरा धोका ब्राह्मणांपासु नसून मराठ्यांपासून
आहे याचा हा पुरावा. ब्राह्मणानी भूतकाळत अत्याचार केले पण मराठा मात्र आज वर्तमानात हे सगळं करत आहे. अन खापट फोडलं जात बामणांच्या नावानी. संभाजी ब्रिगेडनी वरील यादी निट तपासून बघावी अन ठरवावं की बौद्धांवर अत्याचार करणारे ब्राह्मण आहेत की मराठा. अन संभाजी ब्रिगेड सोबत जाणा-या बौद्ध समाजानेही जर डोळसपणे बघायला शिकावं.
भीमशक्ती
संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने याने राजकीय पक्षांच्या दबावाला न जुमानता
हा मुद्दा लावुन धरला. आरोपीमधे सेना, कॉंग्रेस व रा. कॉंग्रेसचे कार्यकर्ते
असल्यामूळे मानेंवर प्रचंड दबाव टाकण्यात आला. तरी सुद्धा माने यानी हि केस शेवट
पर्यंत लढली. ईतर आरोपीनाही शिक्षा व्हावी या साठी माने उच्च न्यायालयात जाणार
आहेत.
एवढ्या
महत्वाच्या केसचा निकाल कुठल्याच
वृत्तपत्रानी छापला नाही. हा सुद्धा जातियवादाचाच प्रकार आहे. आबा पाटलाच्या मतदार
संघातील ही घटना कानाडोळा करण्यासारखी नक्कीच नाही. बौद्धानो सावध व्हा.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा