अनेक प्रयत्न करुन बाबासाहेब दलितांना सामाजीक न्याय मिळवून
देण्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधितरी अस्पृश्यांबद्दल
सदभावना जागॄत होईल या आयेशी ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू धर्मात आपल्याला
आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. मागच्या पाच वर्षापासून
नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनूयायी मोठ्या
जिकरीने लढा चालविला होता. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या
बरोबरीचे वाटले नाही. त्याना दलित व अस्पृश्य जनता ही नेहमी कुत्र्या
मांजरापेक्शाही खालच्या दर्जाची वाट्ली. याचा एकंदरी परिणाम असा झाला की
बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा मागच्या पाच वर्षात मातीत मिसळला. याच दरम्यान
जेंव्हा नाशिकचा लढा चालू होता तेंव्हा बाबासाहेब गोलमेज परिषदेत गुंतून गेले
होते, त्यामूळे त्यानी आपल्या कार्यंकर्त्यां मार्फत हा झगडा सतत पाच वर्ष केला.
तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यामातून जमेल
तितकं अस्पृश्यांसाठी खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले.
पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यानी अस्पृश्याना मंदिर प्रवेशापासून
रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लेढा दिला.
शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून
बाबासाहेब एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा. ज्या धर्मात
आम्हाला कुत्र्याचिही कदर नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करुन
बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्याना बोलून दाखवू लागले, त्यांची मन
चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोनी प्रतिक्रिया
येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजून आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र
बाबासाहेबाना बळ आलं. आपल्या समाजातील मोठा जनसमूदाय या हिंदू धर्माचा त्याग
करण्यास तयार आहे हे कळल्याबर बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली ती म्हण्जे
पर्यायी धर्म निवडायचा कुठला. ईथून निघूण परत दुस-या अशा धर्मात अजिबात जायचे
नव्हते जिथे परत जातियवादाची पुनरावृत्ती होईल. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब
कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मातंर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती
या धर्मांतराच्या घोषणेची. सा-या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी
वागणूकिस कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. अन येत्या
काही दिवसात येवल्यात भरणा-या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.
येवला परिषद
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. हा हा म्हणता
भारताच्या कानाकोप-यातून अस्पृश्य जनता येवले नगरी मोठ्या संखेनी येऊन धडकली.
लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती
असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती.
राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले ईतका प्रचंड
जनसमूदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमूदाय येवल्या नगरीत
बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. अन बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष आयू. अमृत धोंडीबा रणखांबे
होते. लोकानी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी अन हिंदू
धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरु झाले. बाबासाहेब म्हणतात, “मागच्या पाच
वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि
वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाण
हृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे हे आता
पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकिचे अधिकार मिळविण्यासाठी
चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानूष धर्मापासून फारकत घेण्याची
वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व
लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुस-या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व
लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुस-या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत
नाही काय?” बाबासाहेबांच्या या वाक्यानी सभेतील लोकं मोठ्या उत्साहात टाळ्याच्या
गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा
धर्म फेकून दयावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा’ अन हा मूक संदेश
बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यानी प्रतिध्वनीत केल्यावर
बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची भीमगर्जना करतात जी ऐकून भारतच नाही उभ्या भूतलावर
मोठं वादळ उठतं. ते म्हणतात, “मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती
नव्हतं. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.” ही भीम
गर्जना ऐकून अस्पृश्य लोकामधे एक उत्साहची
लाट उसळते. नसा नसात नवचैतन्य भरणारी ही भीम गर्जाना म्हणजे हजारो वर्षाची
हिंदूंची गुलामी झिटकारण्याची अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती. आता अस्पृश्यांच्या जिवनाचे एक नवे पर्व सुरु
झाले, ते या येवलेभूमीनी अनूभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम
होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता.
आता मात्र तो या घोषणेनी मनोमनी या सर्व गुलामीतून मूक्त झाला होता.
बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीम गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या
शेवटच्या माणसा पर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताळावर बसून
बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होतं) किंवा या हिंदू धर्माला
झिटकारुन धर्मांतरा द्वारे मानवी मूल्ये जपणा-या धर्मात मोठ्या मानाने आमचे
धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तय्यारी करण्याचा ईथे निर्णय
करुन अस्पॄश्य बांधव पुनर्जन्म झाल्यागत स्वत:मधे एक अप्रतिम बदल झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या
भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मुल्याच्या झगड्याचा परिणाम होता.
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश
देतात की, आता हा नाशिकचा काळारम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप
खटाटोप केली. हिंदुच्या हृदयात आपल्यासाठी आजिबात स्थान नाही तेंव्हा आता हा धर्म
सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरु होत आहे. आम्हाला देवाच्या
दर्शनासाठी वा भक्तीभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा
अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेंव्हा की यांचा देव अन हे आम्हाला प्रवेश
देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले. तेंव्हा
आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मुल्य़े नाकारणा-याना नाकारण्याच्या
निर्णयावर आलोत. जातीभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको.
आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तय्यारीला लागू या. आणि
अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले
परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जलोषात व उत्साहात परतीला निघतात.
भीम गर्जनेचे उमटलेले पडसाद
बाबासाहेबांच्या भीम गर्जनेनी उपस्थीत पत्रकार लोकांच्या
पायाखालची जमीन सरकते. तसही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे
धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनूभव होता. पण हा धर्मांताची बॉंब मात्र
पुरता भारद हादरवून सोडाणारा होता.
धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड ईतकी प्रभावी नि तडाखेंबंद होती
की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुस-या दिवशीच्या सर्व मुखपत्रातील प्रथम पानावर
ही बातमी छापून येते. बाबासाहेब धर्मातंर
करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने
केलेली ही गर्जना हिंदू धर्मातील विविध लोकांमध्ये मोठं वादळ उठवून जाते. हिंदू
विचारवंत, पिठाधिश, मठाधिश व सामान्य नागरीक प्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक
प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला. अन बाबासाहेब मात्र धर्मांतराच्या
बॉंबनी घायाळ झालेल्या या हिंदूच्या छिन्न विछिन्न अवस्था न्याहाळात निवांत बसले
होते. त्याना हेच पाहायचे होते की आतातरी हा समाज आम्हाला सुधारतो का.
हिंदू धर्मातील समाजसेवक अन पुरोगामी वर्ग मात्र
बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण ईथला
पुरोगामी वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा
उध्दार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्र
पाठवून आपली नाराजी व्यक्त करु लागला. लगेच धर्मांतर न करता आजून पाच वर्ष तरी वाट
पहावी अन हिंदू समाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारे अनेक पत्र
बाबासाहेबाना पाठविण्यात आले.
पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची
अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदुना सुगीचे दिवस येतील.
अस्पृश्यांची संख्या ईतकी प्रचंड होती की जर तो मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात
गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना निस्तेनाबूत करुन सर्व आघाड्यावर
आपलं वर्चस्व गाजवेल हे या मुर्खांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम
धर्म निवडल्यास या देशाचं नाव एक रात्रीत बदलून ईस्लामीस्तान होईल साधं
एवढं समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयात नव्हती. पण याची जाण असलेले
हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थीतीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासू
रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवन्या करु
लागला.
अनेक धर्मगुरुंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव
बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करुन दुस-या कुठल्यातरी धर्मात
प्रवेश करणार याची बातमी हा हा म्हणता साता समूद्रापार जाते अन अनेक धर्माचे
धर्मगुरु जे नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टानी उभं जग
पालथं घालत असतात त्याना मोठी संधी आयती चालून आल्याने उकळ्य़ा फूटू लागल्या. अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबाना आपल्या धर्मात
यावा यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले.
राजगृहावर देश विदेशातून अक्षरश: अशा धर्मगुरुंद्वार पत्रांचा व तारांचा वर्षाव
होतो.
ख्रिश्चनांचे धर्मगूरु बिशप ब्रेनटन थॉबर्न ब्रॅडले, मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्च मुंबईचे बिशप
यानी बाबासाहेबाना ख्रिश्चन धर्म स्विकारुन आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करुन
घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधिपासूनच कसा अस्पृश्य
समाज धर्मांतरी होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले. ख्रिश्चन मिशन-यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा
दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचिही कल्पना दिली.
शिक्षण क्षेत्रातील मिशन-यांचं कार्य मोठं लक्षणिय व वाखाणन्याजोग. याचा दलिताच्या
उत्कर्षासाठी अत्यंत प्रभावी नि सकारात्मक प्रभाव कसा पडेल हे ही समजावून
सांगितलं.
मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबाना तार
करुन मुस्लिम धर्मात येण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही
मुस्लिम धर्मगुरु बाबासाहेबाना भेटण्यास आलेत.
बाबासाहेबानी ईस्लाम स्विकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडुन कशी पैशाची व
ईतस सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यानी
ईस्लाम स्विकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास कसा हिंदूचा थरकाप उडेल हे
ही बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. हिंदू धर्माचे लोक सहसा
मुसलमानांच्या वाटेला जात नाहीत. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मूक्त करण्याचा
खरतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती
करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्या बरोबरच सर्व आघाड्यावर
स्त्री व पुरूष यांचा वयक्तील पातळीवरही मोठा बदल घडावून आणावयाचा होता. शैक्षणीक
क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिल पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात
गरुडाझेप घ्यावयाची होती. हे ईस्लाम मध्ये शक्य
नव्हते. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनाना नकार दिला व
ईस्लामचा मार्ग नाकारला.
शिख धर्माचे धर्मगुरू व सुवर्ण मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष सरदार दरिपसिंग
दोबीया बाबासाहेबाना तार करुन अस्पृश्यांनी शिख धर्मात यावे अशी विनंती
केली. एकेश्वरी शिख धर्म अस्पृश्यांचं
मनोभावे स्वागत करायला तयार आहे. त्याच बरोबर आमच्या धर्मात सर्वाना समान वागणूक
दिली जाते नि विद्यार्जनाचे, उत्कर्षाचे सर्व मार्ग शिख बंधू व भगिनीना सदैव उघडे
असल्या कारणास्तव या धर्मात तुमचा केवळ नि केवळ उत्कर्षच होईल अशी हमी दिली.
बाबासाहेब मधल्या काळात शिख धर्माकडे झुकतातही.
बाबासाहेबाना हा धर्म तसा ईतरांच्या तुलनेत जरा जवळचा वाटू लागला होता.
बौद्ध धम्माचे अनुयायी, महाबोधी संस्था बनारस येथील कार्यवाह यानी
बाबासाहेबाना तार केली. भारतात जन्मलेल्या, जातीभेद ना मानणा-या, सर्वाना समान
समजणा-या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा मोठा
उत्कर्ष होईल. मानवी मुल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे.
भूतलावरील प्रत्येक काना कोप-यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती आहे, अनुयायी व
धम्म बांधव आहेत. आशीया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्विकारलेला आहे.
ईश्वराला काळीमात्र महत्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व
बंधूत्व शिकविणारा आमचा बौद्ध धम्म तुमचा तेजोमय भविष्य घडवून सोडेल. तळागळातल्या
लोकांच्या प्रती अत्यंत करुना बाळगणारा
बौद्ध धम तुम्हा सर्वांचा नवा ईतिहास रचेल अशा प्रकारचं एकंदरीत संदेश
बाबासाहेबाना मिळतं.
गांधी मात्र टोमणं मारायला विसरत नाहीत.
अस्पृश्यांचा प्रश्न निकाली निघण्याच्या टप्प्यात
असताना, शेवटाच्या निर्णायक वळणावर असताना बाबासाहेबानी अशी घोषणा करणे
केवळ दुर्दैव आहे. हरीजन बांधव आंबेडकरांचे काही एक ऐकणार नाही, धर्म काय अशी
रातोरात बदलण्याची वा अंगावरचे कपडॆ बदलावे तशी बदलण्याची गोष्ट आहे का? बहुतांश
हरीजन आंबेडकरांच्या या धर्मांतरास साथ देणार नाही अशी मुक्ताफळं गांधीनी उधळली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यानी मात्र मोठ्या अस्वस्थ व दु:खी मनाने या धर्मांतराच्या
निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली. सावरकरानी रत्नागिरी व परिसरात मोठ्या प्रमाणात
अस्पृश्य निवारणाचे कार्या हाती घेतले
होते. त्यांनी सहभोजन व मंदिर प्रवेशाचे कार्य मोठ्या झपाट्याने चालविले
होते. रत्नागिरी सारख्या कट्टरपंथी कोकणस्थांच्या बालेकिल्ल्यात सहभोजन घडवून आणने
म्हणजे गंमत नव्हती. अस्पृश्य बांधवानी हिंदू धर्मातच रहावे अन यासाठी त्यानी
बदलण्याची गरज नसून हिंदु धर्माने कात टाकावी असा विचार मांडाणारे सावरकर हे नंतर
कट्टरपंथीया द्वारे चांगलेच झोडपले जातात.
अशा प्रकारे बाबासाहेबांच्या धर्मातराच्या भीम गर्जनेनी
सारा भारत दुमदुमू लागला. सर्वत्र मोठा
गहजब उडाला. ईतर धर्मीयाना ही संधी वाटू लागली तर गांधी, सावरकरादि नेत्यानी
बाबासाहेबांवर तोफा डागल्या. सर्व वृत्तपत्रातून झाडून टिकांचा वर्षाव होऊ लागला.
माथेफिरू हिंदूनी मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. काहीनी तर चक्क तारा
पाठवून तसे कळविले. एकानीतर चक्क रक्ताने पत्र लिहून पाठविले की जर तुम्ही धर्मांतर केलात तर तुमचा खून करु. अशा सर्व
स्थरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकंदरीत ही घोषणा हिंदूच्या जिव्हारी
लागली होती व तशा प्रतिक्रिया देशभर
उमटल्या. बाबासाहेब मात्र सेनापती जसे शत्रूच्या किल्यावर तोफ डागून शांतपणे
उध्वस्त तटबंधी न्याहाळतो तसे हिंदूवर धर्मांतराची तोफ डागल्यावर शांतपणे कोसळणारी
हिंदू तटबंदी न्याहाळत होते.
शंकराचार्थ पदाची मागणी:
सर्वत्र धर्मांतराच्या विरोधात हिंदूनी अक्षरश:
बाबासाहेबांवर टिकेची झोड उठविले. तिकडॆ ख्रिश्चन लोकं हिंदूंच मोठ्या प्रमाणात
धर्मांतर करुन यांच्या संख्याबळाला जबरी सुरुंग लावत होते. मुस्लिमानी सुद्धा
मोठ्या प्रमाणात हिंदूचे धर्मांतर घडविणे चालूच ठेवले होते. अन जोडीला
बाबासाहेबांनी केलेली घोषणा प्रत्यक्ष कृतीत उतरल्यास हिंदू एका झटक्यात सर्व
आघाड्यावर मागे फेकल्या जाईल हे चित्र दिसू लागलं. येवले परिषदे नंतर बाबासाहेब
वसईचे मित्र डॉ. सदानंद गाळवणकर यांच्याकडे मुक्कामी गेले. तिथे हिंदू धर्माचे
प्रसिद्ध धर्मगुरु मसूरकर महाराज बाबासाहेबांची भेट घेतात. हे मसूरकर महाराज
हिंदुच्या धर्मांतराचा धोका जानणारे व तो टाळण्यासाठी खटाटोप करणारे एक सच्चे
हिंदू होते. ईतर धर्मांधासारखे डोळ्यावर पट्टी बांधून हिंदू म्हणवून घेणारे
नव्हते. यानी स्वत: गोव्यातील दहा हजार धर्मांतरीत होऊन ख्रिश्चन बनलेल्या लोकांचे
शुद्धिकरण करुन हिंदु धर्मात परत घेतले होते.
ते मोठ्या कळकळीने बाबासाहेबान म्हणतात की धर्मांतर हा तोडगा नसून तुम्ही
कृपया यावर मार्ग सांगा. तेंव्हा बाबासाहेब एक बिनतोड प्रस्ताव मसुरकरांच्या पुढे
ठेवतात. बाबासाहेब म्हणतात, “अस्पृश्य हिंदुला एका वर्षासाठी शंकराचार्य पदावर
बसवावे, अन तुम्ही सर्व हिंदूनी व शंभरेक ब्राह्मणानी वर्षभर सहकुटूंब त्या
अस्पृश्य शंकराचार्याच्या पाया पडून
मनोभावे पुजा करावे. तेंव्हा आम्ही मानू की तुम्ही आम्हास समान समजता व तो दर्जा
देण्याईतपत तूमचे हृदय पालट झाले आहे.” बाबासाहेबांचे
हे वाक्य ऐकून मसुरकरांचा मुखवटा पार गडून पडतो. कारण अस्पृश्याला शंकराचार्य
बनविण्यासाठी लागणारी मानसिकतात ईतरांची तर सोडाच पण खुद्द मसूरकरांची सुद्धा
नव्हती. बाबासाहेबांचं डाव उलटविण्याचं कौशल्य फारच अप्रतिम होतं. पुढच्या माणसाला
पार नागडा करुन सोडायचे. अशा प्रकारे शंकराचार्याची मागणी करुन बाबासाहेबानी
मसूरकराना त्या खिंडीत गाठले जिथे मावळे त्यांचेच, आयुधं त्यांचीच, हमल्याची
रुपरेषा त्यांचीच अन दाणदाणही उडाली त्यांचीच. हे असले भीमास्त्र सोडाण्यात
बाबासाहेब मोठे पटाईत होते.
पुण्यातील परिषद
धर्मांतराचा निर्णय तळीस नेण्याचे काम जोमाने चालविले जाऊ
लागले. जाने १९३६ च्या १२ व १३ तारखेला पुण्यात परिषद भरविण्यात आली. प्रा. एन.
शिवराज यानी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले होते. अध्यक्षिय भाषणात शिवराज यानी एक जबरदस्त मुद्दा मांडला. ते म्हणाले
आर्यांनी आणलेला हिंदू धर्म ईथे रुजण्या आधी आदिद्रविडांचा एक तेजस्वी इतिहास या
मातीला आहे. आपण तो पुनरुज्जीवित करावा. बाहेरून आलेल्या धर्माला पुरुन उरणारा
आदिद्रविडांचा इतिहास मोठा प्रभावी नि तेजस्वी आहे. डॉ. पुरुषोत्तम सोळंखी जे
सुरुवातीला धर्मांतराच्या विरोधात होते ते आता मात्र अनुकूल झाले होते. त्यानी
आपल्या भाषणात नवीन धर्म स्थापन्याचा प्रस्ताव सुचविला होता. बाबासाहेबानी आपल्या
तेजस्वी भाषणात धर्मांतराची गरज, त्याची उपयुक्ततात पटवून देताना धर्मांतरामूळे
रोजगाराचा प्रश्न मिटणार नाही हे अधोरेखित केले. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे
लागेल हे ठासून सांगितले. धर्मांतर हा मानवी मुल्याचा प्रश्न असून पोटा पाण्याचा
प्रश्न मिटविण्याचा मार्ग नव्हे. उपजिविकेच्या आघाडीवर लढण्यास सज्ज होण्याचे
आवाहन केले. पाच वर्षा पर्यंत हिंदूच्या
हृदयपालटाची वाट पाहून तदनंतर धर्मांतर करु असा निर्वाणीचा ईशार दिला. अशा प्रकारे
हिंदूना ५ वर्षाचा अल्टिमेटम देऊन बाबासाहेब पुढच्या कामाला लागतात.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा