जातपात
तोडक मंडळाचे वार्षिक संमेलन (१९३६)
जातपत तोडक नावाची नावाची
त्या काळातील पुरोगामी लोकांची एक अत्यंत प्रसिद्ध संघटना होती. जातियवादाच्या
विरोधात पुरोगामी म्हणवून घेणा-या हिंदु बांधवांची ही जातीयवाद्यांच्या विरोधात
काम करणारी संघटना. पण या संघटनेची कार्यपद्धती मात्र सनातन वाद्याना न दुखविता
जातीयवादाचे निर्मूलन करणारी होती. जातीयवाचाव्या विरोधात मोठी भरीव कामगीरी
करणारी ही संस्था सनातनी लोकांचा कर्दनकाळ बनून फिरत असे. बाबासाहेबांसारख्या
अस्पृश्य उद्धारकाच्या उदयानी ही संस्था अत्यंत भारावून गेली. १९३६ मध्ये लाहोर
येथे भरणा-या जातपात तोडक मंडळाच्या वार्षिक संमेलनाचे अध्यक्षपद बाबासाहेबानी
भुषवावे असा ठराव या मंडळाद्वारे पास करण्यात आला. तदनंतर बाबासाहेबानी अध्यक्षपद
स्विकारावे अशी आग्रहाची विनंती केली.
श्री. इंद्रसिंग नावाचा यांचा एक कार्यकर्ता या संदर्भात मुंबईत येऊन
बाबासाहेबांची भेट घेतो. तसेच डॉ.
गोकुळचंद नारंग नावाच्या धनाढ्य व्यक्तीने संमेलन काळात बाबासाहेबानी आपल्याकडे
राहावे अशी विनंतीही केली. या परिषदेसाठी बाबासाहेबानी अध्यक्षिय भाषण करावयाचे
होते. त्यासाठी त्यानी अत्यंत विद्वत्तेने एक प्रदिर्श भाषण तयार केले.
बाबासाहेबांच्या भाषणाची तय्यारी ही उभ्या भारताला गदागदा हालवून सोडणारी होती.
जातीयवाद्यांच्या अंध नि वर्चस्ववादी मनोवृत्तीला भगदाड पाडणारी होती.
ईकडे मुंबई ईलाख्यात बाबासाहेबांची भीमरुपी गदा
हिंदुत्ववांद्यांवर घणाघाती हल्ले चढविण्यात मश्गूल झालेली होती. बाबासाहेबानी उगड
उघड घेतलेली हिंदु विरोधी भूमीका जातपात
तोडक वाल्याना फारसी आवडली नाही. त्यामूळे
त्यांच्यात बाबासाहेबांच्या अध्यक्षीय पदापद्धल अंतर्गत वादावादी चालू झाली. शेवटी १९३६ च्या मार महिन्यात असे घोषित
करण्यात आले की मंडळाचे वार्ष संमेलन मे महिन्या पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. ९ एप्रिल १९३६ रोजी संताराम हरभगवान नावाचा
मंडळाचा एक सदस्य मुंबईत येऊन बाबासाहेबांची भेट घेतो. बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी भीम गर्जनेनी
लाहोरचे जातपात तोडक मंडळांच्या सदस्यात उडालेले खटके व काही व काही दुखावलेले
वरिष्ठ सदस्य मंडलाचा राजिनामा दिल्याची बातमी घानावर घातली. तरी सुद्धा मंडळ
बाबासाहेबानाच अध्यक्ष म्हणून संमेलनास बोलविण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही
मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. त्याच बरोबर अध्यक्षीय भाषणासाठी बाबासाहेबानी
लिहलेल्या भाषणाचा काही भाग छापण्यासाठी म्हणून या सदस्याने सोबत घेतला. ईकडे बाबासाहेबांची भीमरुपी गदा मात्र काही
केल्या थांबेना. सनातन वाद्यांवर भीमास्त्राचा मारा सतत चालू होता. त्याच बरोबर धर्मांतराची घोषणा झाल्यापासून
हिंदू समाजात सर्वत्र एक हाहाकार उडाला
होता. चहू बाजूनी बाबासाहेबांवर टिका, शाप
नि दुषणांचा भडीमार होऊ लागला. प्रतिउत्तरात लढ्यात बाबासाहेबही मोठ्या विर्याने
उत्तर देत, विद्वानाच्या बैठकीतला हा महामानव या सर्वांवर भीमास्त्र सोडून
सनातन्याना घायाळ करी. हिंदू धर्मावरील
अत्यंत टोकाची टीका, धर्मग्रंथाना लावलेल्या तत्वज्ञानाच्या कसोट्या व वेद, स्मृती नि श्रृतींचा तर्कबुद्धिने
घेतलेला समाचार ईतका मनोवेधक आणि मर्मभेदक असे की बाबासाहेबांपुढे हिंदीचे लढवय्ये
नांगी टाकून पळ काढीत. पण याची दुसरी बाजू
होती की, हिंदूंच्या मनातील द्वेष वृद्धिंगत होत गेला. बाबासाहेबांचे विरोधक वाढत गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की, जातपात तोडक
मंडळासारखी स्वत:ला पुरोगामी
समजणारी संस्था बाबासाहेबाना अध्यक्ष बनविण्यात धोका मानू लागली. शेवटी
बाबासाहेबांच्या हिंदू विरोधी लढ्याचा परिणामी धसका घेऊन पुरोगाम्याचं सोंग आणणारी
ही जातपात तोडक मंडळ नावाची संघटना लाहोर येथे भरणारे वार्षीक संमेलन कायमचे
स्थगीत करते. अशा प्रकारे बाबासाहेबांचे अध्यक्षीय भाषण निकाली काढले. या
संमेलनासाठी लिहून घेतलेले प्रदिर्घ भाषण तय्यार होते. परिषद रद्द झाल्यामूळे या
भाषणाची एक लहानशी पुस्तीका छापून घेण्याचे ठरले. जातीचे निर्मूलन
(अनायलेशन ऑफ कास्ट) नावाची पुस्तीका इंग्रजीत छापण्यात आली. लवकरच या पुस्तीकेचे
जवळपास सात आठ भाषेत भाषांतर करण्यात आले. आणि या लहानशा पुस्तीकेने त्या काळात
भारतभर खडबड उडवून दिली. हिंदू धर्माचे वाभाडे काढणारी ही पुस्तीका हिंदू
धर्मग्रंथाचा समाचार घेणारी तर्क व तत्वाच्या कसोट्या लावून धर्मग्रंथाचा धुव्वा
उडविणारी आहे.
शीख
धर्माची चाचपणी
१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी
अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोप-यातून अस्पृश्य वर्गाचे
लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबही
आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट ईथे हजेरी लावतात. सेवानिवृत्त न्यायाधिश
सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे
अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व ईतर अनेक मंडळीनी मोठ्या अभिमानानी शीख धर्माचा
जाहीर नि विधीवत स्विकार केला. या परिषदेत
बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण झाले. बाबासाहेब ईथे शीखांच्या भूमीत बोलताना
मोठ्या त्वेषाने भीम गदा फिरवीतात आणि परत एकदा जाहीरपणे धर्मांतराच्या निर्णयावर
ठाम असल्याची भीम गर्जना करतात. या परिषदेच्या मंचावरुन उभ्या भारताला एक आव्हान
करतात की, “हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामचे,
दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव आमच्यावर लादले. अत्यंत घृणास्पद नि
खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जिवनास हानिकारक
आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेचि तत्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष
करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगती प्रवर्तक आहेत. त्यामूळे मला शीख धर्म मनातून आवडु
लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय
अढळ आहे, फक्त तो केंव्हा करायचे हे आजून ठरायचे आहे.” अशा प्रकारे आपला पुढील कार्यक्रम काय असेल
याचं ओझरतं दर्श त्यांच्या या भाषणातून तमाम त्या लोकांपर्यंत ज्पोहचलं ज्यांच्या
पर्यंत पोहचायला पाहिजे होतं.
प्रतिनिधी
सुवर्ण मंदिरात पाठविले.
आता मात्र धर्मांतराची
चळवळ अत्यंत वेगाने आकार घेऊ लागली. बाबासाहेबांच्या वादळी प्रचाराने भारतभर खडबळ
उडाली. हिंदू धर्मातील सर्व आघाड्या पेटून उठल्या अन बाबासाहेबांवर चतूरस्त्र टिका
होऊ लागली. बाबासाहेब मात्र प्रत्येक टिकेगणिक अधिक दृढनिश्चयी व ठामनिर्णयी बनत
गेले. शीख धर्माकडील त्यांचा झूकाव अल्लेखनिय होता. उपलब्ध तमात धर्मातुन हा धर्म
बाबासाहेबाना आकर्षित करुन गेला. पन
भावनेच्या भारात तडकफडकी निर्णय घेऊन नंतर पश्चाताप करनार बाबासाहेब नव्हते. जो कुठला धर्म स्विकारायचा त्याचा खोलवर अभ्यास
करुन, मानवि मुल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंका कुशंकाचे निराकरन झाल्या नंतरच धर्मांतर करायचे या मताचे
बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतन्या मुकंद याना बाबासाहेबानी
अमृतसर येथील गुरुद्वारेत वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारेतील
शीख बांधवानी या दोन तरुणांचे मोठे
आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन
मोठ्या आनंदाने ही मुलं परत आली.
१३
जणांची तुकडी
१८ सप्टे १९३६ रोजी
बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला
रवाना केली. मुलगा व पुतण्या यानी
दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक
होता. धर्मांत चळवळीतील शीख धर्माच्या दिशेनी पडलेले हे आजून एक पाऊल होते. हा हा
म्हणता ही तुकडी अमृतसरला पोहचून शीख धर्माचा अभ्यास सुरु केला. दरम्यान काळात
झालेल्या पत्र व्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारे अनेक पत्र बाबासाहेबाना
मिळाले. उत्तरादाखल लिहलेल्या पत्रात
बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा
दिल्या. ईकडे बाबासाहेब ईतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर ईतका प्रभाव पडला की
या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता तडक शीख धर्माची दिक्षाच घेऊन
टाकली. खरतर बाबासाहेबानी याना अभ्यासासाठी
पाठविले होते. धर्म स्विकारण्याचा निर्णय आजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला
हा निर्णय ईतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकल्या गेले. जेंव्हा ते मुंबईत परतले तेंव्हा त्याना कुणी
काळ कुत्रही पुसेना. यांचा कधी विषय
निघाल्यास बाबासाहेब म्हणत, “देव जाणे
त्यांच काय झालं ते” अशा प्रकारे धर्मांतर
चळवळीची वाटचाल चालू होती.
शीखांशी
मतभेद आणि काडीमोड
बाबासाहेब शीख धर्माचा
स्विकार करतील याची सर्वत्र चर्चा चालू झाली. याच दरम्यान आजून एक दुसरीच समस्या
उद्भवू लागली. अस्पृश्याना विधिमंडळात मिळालेले आरक्षण हे हिंदू धर्मातील एक जात
(वर्ग) म्हणून मिळाले होते. पण जर अस्पृश्यानी हिंदू धर्माचा त्याग करुन शीख धर्म
स्विकारल्यास या आरक्षणाचे काय? असा नवीनच निर्बंधीक पेच तयार झाला. बरं शीखानाही
राखिव जागा मिळाल्या होत्या पण त्या फक्त पंजाब प्रांतापुर्ती मर्यादीत होत्या.
धर्मांतरा नंतर शीख हे भारतभर असणार पण शिखांचे आरक्षण मात्र भारतभर लागू नव्हते,
अशी ही नवीन अडचण उभी ठाकली. अस्पृश्यानी शीख धर्म स्विकारावा यासाठी हिंदू
महासभेचा पाठिंबा मिळविण्याचे काम सुरु
झाले. १८ जुन १९३६ रोजी बाबासाहेब व डॉ. मुंजे यांची या संदर्भात एक भेट झाली. सर्व
बाजुनी चर्चा झाल्यावर व हिंदू महासभेच्या
प्रमुख सदस्यांची संमती घेतल्यावर डॉ. मुंजे व हिंदू महासभेनी अस्पृश्यांच्या
धर्मांतरास व शीख धर्म स्विकारण्यास पाठिंबा दिला. पण शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील
मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा
झाला की शीख धर्म स्विकारण्याचा
विचार सोडून दयावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची अतिरिक्त जाबाबदारी
अंगावर पडली.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा